सकाळला प्रत्युत्तर आवडले. आयटी काय किंवा आणखी दुसरे काम, दुरून डोंगर साजरे हेच खरे.

किती काम करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला माझे काम आवडते त्यामुळे मिळेल त्या सगळ्या वेळात मला ते करावेसे वाटते. 

सध्या स्पर्धा इतकी झाली आहे की वर्षाला १२ लाख पगार मिळणाऱ्याला, १२.५ लाख वाल्याचा हेवा वाटतो आणि स्पर्धेने, इर्षेने येत्या वर्षात त्याला मागे टाकावेसे वाटते. मला वाटते सध्या नुक्त्या विशीत येणाऱ्या पिढीला लहानपणापासून स्पर्धेचे बाळकडू पाजल्याचा हा परिणाम आहे.