ऑपरेशन हाच एक कर्करोगावर ऊपाय असतो असे नव्हे.. 
कँसर कोणत्या स्टेज ला पोहचला आहे त्यावर ऑपरेशन करायचे का.. की फक्त किमो ट्रीटमेंट नि पुर्ण बरा होईल..
की फक्त केवळ किमो आणि रेडीयेशन नि बरा होईल हे सर्व कँसर कोणत्या प्रकारचा आहे .. आणि तो कोणत्या स्टेज मध्ये आहे ह्यावर
अवलंबून असते.. 
कँसर चे साधारण २ प्रकार असतात १ बेनाईन आणि २ मॅलाईन.. 
बेनाईन कँसर हा सहजासहजी क्युअर होउ शकतो.. कारण ह्या मध्ये कँसर पेशींच्या फक्त गाठी तयार झालेल्या असतात. 
तरी सुद्धा जर वेळेवर याचे निदान नाही झाले.. तर हा प्रकार पण हाता बाहेर जाऊ शकतो.. 

दुसरा प्रकार म्हणजे .. मॅलाईन.. ह्या मध्ये कँसर पेशी ह्या आपल्या चांगल्या पेशींवर मात करत प्रसरण पावत असतात.. 
आपण जो वरती निसर्ग नियम ऑपरेशन ई..  वगैरे लिहीले आहे. ते ह्या प्रकारा मध्ये मोडते. 
हा दुसरा प्रकार म्हणजे अत्यंत घातक अश्या स्वरुपाचा आहे.. कारण हा कँसर लवकर डीटेक्ट होत नाही.. 
आणि जेंव्हा डीटेक्ट होतो तेंव्हा वेळ निघून गेलेली असते.. 

असो तर आपण सांगितल्या प्रमाणे रुग्नाचे वय ७३ असेल आणि ऑपरेशन सुद्धा काही फायद्याचे नसेल.. तर माझ्या अंदाज्याने कँसर हा तिसरी स्टेज मध्ये आहे किंवा तो पार केला आहे.. 
आता आपण फार तर फार रेडीयेशन किंवा किमो ने रुग्नाचे जगण्याचे दिवस वाढवायची शक्यता आहे.. 
तर ह्या मध्ये सुद्धा रुग्ण ७३ वर्षाचा असल्यामुळे मला वाटत नाही रेडीयेशन किंवा थेरेपी देण्यास कोणी डॉक्टर सांगेल.. 
कारण हे अत्यंत घातक अश्या प्रकारचे डोस असतात जे की आपल्या नॉर्मल पेशींना सुद्धा म्रुत करतात.. 

आता आपला मुळ प्रश्न आयुर्वेदा मध्ये ह्यास ऊपचार आहे की नाही.. ?
ह्याचे ऊत्तर देणे खरच खुप क्ठीण आहे.. कारण गुजरात मध्ये वलसाड ला एक हॉस्पीटल आहे त्याची लिंक अशी.. 
दुवा क्र. १

तिकडे गायीचे शेण वापरून .. आणि व्यायाम, फलाहार ई. प्रकार करुण रुग्नाला ट्रीटमेंट दिली जाते.. 
ईकडून बरेच रुग्न ठीक झाल्याचे ऐकीवात आहे.. 

जर आपण बर्याच गोष्टी वैज्ञानीक द्रुष्टीकोनातून पाहत असाल तर आपणास अंबरनाथ (मुंबई) येथे एक होस्पीटल आहे.. 
पण त्यामध्ये रुग्न भरती करायचा झाल्यास बर्याच जाचक अटी आहेत.
१ रुग्न पुर्णपणे कधीच बरा होणार नसेल तरच ऍडमीट करावे 
२ रुग्न म्रुत झाल्यावर त्याची डेड बॉडी आपणास मिळणार नाही
३ रुग्नास आपल्या आठवड्यातून फक्त एकदाच भेटता येईल.
४ रुग्नाचे जितके अवयव ऊपयोगी असतील ते म्रनोत्तर दान केले जातील.. 

ह्या हॉस्पीटल मध्ये रुग्न भरती फुकट आहे कारण ते रुग्नाचे अवयव मरणोत्तर वापरतात.
तसेच ह्या हॉस्पीटल मध्ये रुग्न भरती केल्यास त्याला कँसर चा कसलाही त्रास होत नाही.. अगदी मजेत तो राहतो असे ऐकीवात आहे..
तसेच रुग्नाला म्रुत्यू सुद्धा अगदी समाधानकारक पणे येतो.. असेही ऐकीवात आहे.. 

समाधानकारक म्रुत्यू सर्वांनाच हवा असतो.. आता ती वाट कधी कोठे कशी शोधायची हा ज्याचा त्याचा निर्णय आहे.. 

बाकी आपल्या रुग्नास पुढील ऊपचारांसाठी शुभेछा

धन्यवाद..