शुद्धलेखनच नाही तर व्याकरण, शब्दरचना आणि मतेसुद्धा दुरुस्त करून लेख परत लिहायला हवा.
उदाo हिंदुस्थान, राज का रण(? ), दिशाभूल, सुखदुःख, जात-धर्म  हे सामासिक शब्द आहेत, ते तोडता कामा नयेत.  सिंधूपासून, काहीही, कन्याकुमारीपर्यंत व आजपर्यंतचा यांतील पासून, ही आणि पर्यंत ही शब्दयोगी अव्यये आहेत, ती आधीच्या शब्दाला जोडून यावयास हवीत. कमरेच म्हणजे काय?  याचा रेच(=जुलाब) या शब्दाशी काही संबंध आहे का?  माथ्यावर म्हणजे अबव्ह द हेड.  हा अर्थ अभिप्रेत आहे का? की 'डोक्याला' पाहिजे होते?  माथा म्हणजे डोक्याचा वरचा पृष्ठभाग! रहिवासी हा प्रमाण शब्द आहे रहिवाशी नाही. ही(हि‌ नाही! ) बलस्थाने असे म्हटले की, एकापेक्षा अधिक बलस्थानांची नावे द्यावयास पाहिजे होती, तशी दिलेली नाहीत. भारतीयांनी राजकारणी असू नये का? की राजकारण्यांनी भारतीय?  वाटत म्हणजे वाटतवाटत?  नुसतेच सिंधूपासून कन्याकुमारीपर्यंत लिहून भागणार नाही, पुढे देश, प्रदेश,  भूमी असे काहीतरी यायला हवे होते. 
लेखात कुठेही स्वल्पविराम नाहीत;  लेख कसा वाचावा? --अद्वैतुल्लाखान