नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण, दुवेदार लिखाण. आवडले.
एक काळ रुपेरी पडदा गाजवलेल्या वृद्ध कलाकारांचा करुण, एकाकी शेवट काळीज भेदून जातो. 'दारुच्या रिकाम्या बाटल्या विकल्या असत्या तर मुंबईत एक फ्लॅट घेता आला असता' असे मिष्किलपणे म्हणणारे भगवानदादा एका अंधाऱ्या चाळीत शेवटचा श्वास घेतात. तलतला 'गलत महमूद' आणि गीता दत्तला 'जूता दत्त' म्हणणारा सज्जाद हुसेनसारखा गुणी पण परखड संगीतकार कित्येक वर्षे अंधारात राहून निष्कांचन अवस्थेत मरण पावतो. अनिल विश्वासच्या अंत्ययात्रेला फिल्मी इंडस्ट्रीमधले कुणी म्हणजे कुणी असत नाही. बालगंधर्वांच्या पार्थिवाचे दहन करायचे की दफन यावरून वाद होईल म्हणून त्यांना चोरटेपणानेच ओंकारेश्वरावर अग्नी दिला जातो. 'जगा तुझी रीत सदा  उरफाटी'  असे  वाटायला  लावणारे  हे  प्रसंग.  असो.