आणि मराठीत सुरवातीपासून आतापर्यंत जे बदल झाले, घडले ते सगळे संकेतानुसार किंवा संकेत पाळल्यामुळेच/पाळत-पाळतच झाले/घडले का?

प्रस्तुत प्रसंगात ('संग्रहणीय - योग्य की अयोग्य') उलटे होत आहे असे मला वाटते.

संग्रहणीय हा शब्द कविधाविचे संकेत पाळावेसे वाटल्याने मनात आलेला आहे असे वाटते. कविधाविचे संकेत पाळून संग्राह्य - संग्रहव्य - संग्रहणीय अशी रूपे मनात येणे स्वाभाविक आहे. (मनोगतावरच पूर्वी  एका सदस्येने असा प्रयोग केलेला होता असे आठवते. चू. भू. द्या. घ्या. ) आता हे संकेत निसर्गतः, अंगवळणाने, प्रतिक्षेपानेच पाळले गेले असतील असे नव्हे तर सर्व शक्यतांचा सांगोपांग विचार करून, तोलून मापून विचारपूर्वकही पाळले गेले असतील.

'संग्रहणीय ऐवजी संग्राह्य' हा अपवाद त्या संकेतांत केलेला/सांगितलेला बदल आहे/होता असे मला वाटते.