राधिका,
खरं तर कथा संपवून माझ्याही मनावर जडत्वाचा प्रभाव आहे.
अभिप्राया बद्दल धन्यवाद.


श्री. पद्मसंभव,
अपार प्रेम करणाऱ्या दोघांतील एक व्यक्ती आपला जीवनप्रवास (त्या वयात) संपवते तेंव्हा मागे राहिलेल्या साथीदाराची अवस्था कधी कधी अत्यंत बिकट होते आणि ती व्यक्ती पैलतीराकडे डोळे लावून बसते. आजूबाजूच्या 'इतरांना' ते जाणवत देखिल नाही. किंबहुना, कधी कधी 'त्या' व्यक्तीलाही ते जाणवत नसावं, पण ते वास्तव असतं. इहलोकीच्या आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता आणि परलोकीच्या आपल्या साथीदाराला भेटण्याची आंस याचा परिपाक त्या व्यक्तीच्या आपल्या जीवनाच्या समाधानी शेवटाने होतो असे मला वाटते. त्यामुळे कथा दुःखांत असली तरी अप्पांसाठी तो 'सुखांत' आहे.
धन्यवाद. 

श्री. मयुरेश वैद्य,
माझीही अवस्था वेगळी नाही. अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

श्री. भाष,
धन्यवाद. आपण केलेले विवेचन नेमके आहे. कथानकाचे मध्यवर्ती वातावरण 'मध्यमवर्गीय' आहे. बगलेत ओघळलेले, भोकाचे गंजीफ्रॉक वापरणाऱ्या अप्पांचे ३ लाख ४७ हजार, ही त्यांची आयुष्यभराची पुंजी आहे जी ते आपल्या पश्चात आपल्या पत्नी साठी ठेवू इच्छितात. अप्पा आणि काकू हे जे कुटुंब मागे उरले असते त्यांचा आर्थिक आवाका तेवढाच असतो. परंतु, एकमेकांवरील डोंगरा एवढे प्रेम, मोजक्याच शब्दात जाणवते. तेच खरे, शाश्वत.
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद.

धन्यवाद नीलहंस.
शेवट अनपेक्षित नाही. अप्पा जाऊ इच्छित नव्हते परंतु काकूंना दिलेल्या वचनाला जागण्यासाठी, काकूंवरील प्रेमापोटीच अप्पा अमेरिकेला जायला तयार होतात. परंतु, 'यशोदे'च्या भेटीची ओढ जास्त प्रभावी ठरते.

धन्यवाद सुवर्णमयी,
खूप दिवस मनातून जाणार नाही असे वाटते.
खरे आहे तुझे म्हणणे. माझीही तीच अवस्था आहे.  

धन्यवाद श्री. विनायक,
असाच वाढता लोभ राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.