जय माता जी , जम्मू मध्ये सुद्धा पतंगोत्सव साजरा केला जातो आणि तो दिवस असतो रक्षाबंधनाचा , भाऊ आपल्या बहिणी कडून ओवाळल्या नंतर सरळ गच्ची मध्ये जातो आणि पतंग ऊडवतो. तिकडची फीरकी आपल्या फीरकी सारखी नसते , जसा आपल्या कडिल दोरर्याचा गुंडा असतो ना तसाच मांजा गूंडाळला जातो.
तसेच मध्यप्रदेश मध्ये सुदधा पतंग ऊड्वले जातात पण त्याला विशिष्ठ असा दिवस नसतो,उन्हाळ्याचा सुटी मध्ये पतंग उड्वले जातात , सकाळ पासून पतंग उड्वयला सुरुवात होते ती रात्री आठ वाजे पर्यंत उड्वतात.
माझा मते आपण सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत पतंग उड्वायला सुरुवात करायला पाहीजे कारण उन्हाळ्यात दिवस मोठा असतो आणि सध्याची लहान मुले कार्टून बघून मैदानी खेळा कडे दुर्लक्ष करतात व बुद्दिला चालना मिळत नाही.