प्रथम मी , संजय आणि मी पुणेरी यांचे प्रतिसादाबद्दल आभार मानतो. संजय आपल्या प्रश्नाचं उत्तर
माझ्या मते असं आहे. जीवनातली पातळी आणि मृत्यू या गोष्टी बऱ्याच वेळा माणसाच्या आयुष्याला आणि एकूणच वागणुकीला कलाटणी
देणाऱ्या ठरतात. माणसाच्या वागणुकीवर त्याचे निर्णय अवलंबून असावेत असं वाटतं, तसच आपल्या संबंधात येणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
(आवडणाऱ्या असो वा न आवडणाऱ्या असो) हाही माणसाची निर्णय क्षमता बदलू शकतो. कित्येक वेळेला असा मृत्यू माणसाच्या आयुष्यात
नवं पर्व सुरू करू शकतो, ते चांगलं असेल अथवा वाईटही असेल, अर्थातच योग्य असेल असे नाही. आणि म्हणूनच माझ्या कथांमध्ये मृत्यू
ही धटना महत्त्वाची असते. मला स्वतः ला असे अनुभव आलेले आहेत. एकूण वागणूक (म्हणजे ऍप्रोच ) आणि मृत्यूची सत्यता हे माझ्या
दृष्टीने महत्त्वाचे आहे. अर्थात माझं मत व विस्लेशण बरोबर असेलच असं नाही. खरं सांगायचं तर मनुष्य कसा वागेल हे सांगणं फार
कठीण आहे. म्हणून तर लिहायला विषय भरपूर आहेत. असो. मी आपल्या सारखा अध्यात्मिक लेख लिहिणारा नाही. त्यामुळे माझ्या
विचारांवर मर्यादा येते. प्रतिसादाबद्दल परत एकदा आभार. जर या स्पष्टीकरणात आपण दुखावले गेला असाल तर माफ करा.