जागृत देवस्थानं, संतांचा वास असणारी देवळे-मठ, तीर्थक्षेत्रे ही सारी
अमृताचा स्त्रोत असलेली ठिकाणं. तिथं मनात शांतीला धुमारे फुटतात. जीवनाला
गती लाभते. सात्विकतेचा वसंत मनाच्या वनाला अनोखे रूप प्रदान करतो. तिथं
भक्ताला अमृताचा लाभ होत असतो. म्हणूनच भक्ताला तिथं जावंसं वाटत राहतं.
त्याची तृप्ती तृप्त होते नसते....
... आणि हृदयीचा भगवंत मग अनावृत्त होतो.
या दृष्टीनेही भारतात जन्म मिळणेही भाग्याचेच.