गंगाधरजी म्हणतात ते काही चूक नाही. आम्हाला लहानपणापासून या सगळ्याची सवय लागलेली असते, या ना त्या स्वरुपात. देवाला सर्वशक्तिमान, भूतलाचा स्वामी म्हणायचे आणी त्यालाच माझे एवढे काम कर तुला अमके तमके देतो म्हणून नवस नावाची लाच द्यायची. खरे तर मागितले त्यापेक्षा कितीतरी कमी किंमतीतीत आपण त्याला पटविलेले असते. आता हे सगळे आपण लाच या कलमाखाली धरतच  नाही.
 ह्या भांडवली व्यवस्थे मध्ये आपण सगळी मूल्ये बासनात गुंडाळून ठेवली आहेत. ऐहिक सुखांच्या मागे लागत अनाठायी गरजांचा पाठपुरावा करण्याच्या उरस्फोडी पुढे आपल्याला अगदी सर्वसामान्यांनाही किती बाबतीत विधिनिषेध असतो? जित्याची खोड झाली आहे आता ती ... आपली त्यातून पूर्णाअंशाने बाहेर पडण्याची इच्छाही नाही.