संजयजी,

सर्वप्रथम उत्तराबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बघितल्यास , हे म्हणजे आपल्याला राग (उदा. दाखल) येत नाही या बोधाने जगायचे, रागाकडे दुर्लक्ष करायचे (दमन) असेच काहीसे होईल. जोपर्यंत सत्याची खरोखर जाणीव होणार नाही, तोपर्यंत हे ढोंगच ठरेल, राग तर अंतर्यामी निर्माण होतच राहणार. आणि हे आपले आपल्यालाच जाणीवपूर्वक  फसविण्यासारखे होईल.

तुमची सर्वांना सत्याची माहिती सहज सोप्या शब्दात देण्याची कळकळ खरेच भावली. तुम्ही सत्य निश्चित जाणले आहे याबद्दलही शंका नाही. म्हणूनच मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की सत्याचा बोध तुम्ही सांगता त्याप्रमाणे सोप्पा जरी असला तरी तुमच्या प्रत्यक्ष माहितीत किती जणांना हा झाला आहे? मला वाटते की हा अतिशय दुर्मिळ प्रकार आहे, (शंकराचार्य/ अनेक नामवंत प्रवचनकार इ. ना सुद्धा खरोखर सत्य समजले असेल की नाही? माहिती नाही)  आणी मी जे काही वाचन केले आहे त्यावरून ही एक अचानक घडणारी घटना आहे. (ओशो,यू‍. जी. क्रुशनमुर्ती,एकहार्ट, तुम्ही स्वतः:) त्यावर आपले नियंत्रण ही नाही आणि ते घडवणे आपल्या हातातही नाही.

यावरून असेच वाटते की ज्याच्या नशिबी (नशीब शब्द लकी या अर्थाने) असेल, त्यालाच ते मिळेल.एकदा ज्ञानोदय झाल्यानंतर मात्र सत्यप्राप्तीचे विविध सोपे मार्ग दिसतात, जे की तोपर्यंत दिसत नव्हते,किंबहुना दिसूनही उमजत नव्हते़ आणि सत्य गवसल्यानंतर त्या मार्गांचा त्या ज्ञानोदयी व्यक्तीला काहीही उपयोग रहात नाही. परंतु इतरानं फायदा व्हावा म्हणून त्याने ते सांगितले तरी इतरांची "कळते पण वळत नाही" ही स्थिती बदलू शकत नाही,कारण त्यांना ते "उमजतच" नाही.ते उमजण्यासाठी "तो" क्षणच यावा लागतो जो आपल्या हातात नाही.

कळस