व्यंकटेश माडगूळकरांची आठवण आली. त्यांची मिताक्षरता वगळता तशीच नेमकी आणि चपखल शब्दयोजना आणि चित्रदर्शी शैली. राकट, कणखर, दगडांचा देश ही विशेषणे अशाच खडबडीत खेड्यांमुळे महाराष्ट्राला लाभली असावीत. (की संपूर्ण भारतच अशाच खेड्यांचा मिळून बनलेला आहे?) या खडबडीतपणामागचे कारुण्य आणि प्रवाहपतित गतानुगतिकता मनाला स्पर्शून गेली. क्षणभर सुन्न वाटले. सुंदर लेखनानिमित्त अभिनंदन.