आरोग्यदायी जीवनासाठी वर उल्लेखिलेल्या चांगल्या सवयी आवश्यक आहेत यात फार दुमत असण्याचे कारण नाही. परंतु तेवढे पुरेसे आहे का?
आधुनिक जीवनशैली जेव्हा नव्हती, म्हणजे दोन-तिनशे वर्षांपूर्वी काय चित्र होते? किती जन्म होत असत, आणि त्यातले किती पुरेसे जीवन (म्हणजे स्वतःला मुले किंवा नातवंड होई पर्यंत) जगत असत? जगाची लोकसंख्या आत्ताच्या गती पेक्षा (कुटुंब नियोजन हा विचारही कोणाच्या मनी आलेला नसताना) खुपच सावकाश का वाढत होती?
आपण जर कुणा दीर्घायुशी आणि आरोग्यवान आजोबांशी बोललो तर लक्षात येते की त्यांची काही भावंडे जन्मतःच, किंवा बालपणातच गेलेली असतात.
निसर्गाची ही स्वतःची निवडीची पद्धत आहे. त्यात हस्तक्षेप झाल्यमुळे जे असे लहानपणीच मृत्यू पावणार होते, ते जगतात, जनन दर कमी झाल्यामुळे एकुण निरामय लोकांची संख्याही कमी राहते.
यात भरीस भर म्हणून एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पोसण्यासाठी धान्य, फळे, भाज्या, मांस वगैरेही निकृष्ट दर्जाचे बनवावे लागते (म्ह. उपलब्ध जमीन पाणी वगैरे जमेस घेता सर्वासाठी 'ऑर्गानिक' अन्न बनवणे कठिण आहे). वरील मुद्दे तर आहेतच.
एकुण जन्मतःच निरामय असणार्या लोकांची घटलेली टक्केवारी हेच या मागचे मूळ कारण असावे असे वाटते.