मन म्हणजे स्वयंचलित विचार, भावना आणि मूडस्! 

ही आत चालू असलेली बडबड, भावनांचे हिंदोळे आणि अगम्य मूडस् ज्याला कळतात ती निराकार जाणीव म्हणजे आपण!

आपल्यात काहीही झालं तरी कोणताही बदल होत नाही, आपण जसेच्या तसे राहतो हे एकदा कळलं की विषय संपला!

तुम्हाला आता, हे वाचून, या क्षणी,  मी काय म्हणतोय ते फक्त एकदा जरी कळलं तरी काम झालं!!

कारण तुम्हाला क्षणकाल का होईना आपण कोण आहोत याचा बोध झाला.

आता फक्त पुन्हा पुन्हा या बोधात स्थिर होता आलं की प्रसंगात स्थिर राहण्याची क्षमता येते आणि मग जीवनाचा रंग बदलून जातो!