उत्तम लेख. भूक लागल्यावर जेवण्यापेक्षा जेवण्याच्या वेळेला जेवण्ं , या पद्धती मुळे घेतलेल्या आहाराचा उपयोग होत नाही.  आपलं
निरिक्षण बरोबर आहे. खरं तर सणासुदीचा भोजनाचा आनंद हाही नष्ट झाला आहे असं मला वाटतं. कारण पक्वान्न हल्ली केव्हाही केली जातात
किंवा विकत आणून केव्हाही खाल्ली जातात, तसच त्यात वैविध्यही पूर्वीपेक्षा फार आहे. म्हणून पक्वान्नांचं महत्त्व राहिलं नाही. तोच प्रकार
कपड्यांचा . पूर्वी सणासुदीला कपडे मिळत असत, आता ते केव्हाही विकत घेतात आणि घालतात. आपलं लिखाण छानच आहे. आपण
सांगितलेला वज्रासनाचा उपाय करून पाहिल्याशिवाय कळणार नाही , म्हणून त्यावर लिहीत नाही. लिखाणातला साधेपणा जागोजागी
जाणवतो. वेगवेगळे विषय हाताळण्यात आपण कुशल आहात असं नेहेमी वाटतं. असो. वाचून बरं वाटलं.