पेठकरांच्या कथा छानच असतात.
ही कथाही छान आहे. सगळ्यांना आवडेल अशी आहे. हुकमी आहे. शेवटचा परिच्छेद नसता तरी चालले असते. ह्या भागाची गरज नव्हती -
मी सरळ माझ्या रूम मध्ये गेलो. माझ्या पाठोपाठ आई आंत आली. मी टेबलावर हाताची घडी ठेवून त्यावर डोकं टेकून बसलो होतो. आईने माझ्या पाठीवर हात ठेवला. 'जाऊदे, शशांक, होतं कधी कधी असं. मनाला लावून घेऊ नकोस.' माझ्या चेहऱ्याकडे न बघता तिने माझं दुःख वाचलं होतं. आई होती ती माझी. भावना अनावर होऊन मी अश्रुंना वाट करून दिली..........
गुजराती धाटणीच्या पत्रिकेवर कथा संपली असती तरी बरे झाले असते. त्यानंतर अश्रूंना वाट करून देईपर्यंत आईने दुःख वाचणे वगैरे थोडं शब्दबंबाळच आहे. भावना अनावर होणे साहजिकच आहे. पण सांगायची काही गरज नव्हती.
चित्तरंजन