विवेकसिंधू हा ग्रंथ जरी आज आद्य मराठी ग्रंथ मानला जात नसला तरी त्याचा काल बहुधा ज्ञानेश्वरसमकालीनच मानला जातो. थोडासा अलीकडे पलीकडे इतकाच‌. शिवाय त्या ग्रंथाचे  साहित्यिक मूल्य फारसे मानले जात नाही. त्यातल्या तत्त्वज्ञानाच्या आशयामुळेच तो उल्लेखनीय आहे.पण आता मराठीच्या भाषिक उत्क्रांतीच्या टप्प्यांचा अभ्यास करताना संशोधकांना त्याची भाषेच्या अनुरोधाने दखल घेणे भाग पडते. त्याची भाषा ज्ञानेश्वरीपेक्षा सोपी आहे.