कारण जाणण्यासाठी तरी जाणलं जाणारं, जाणणारा आणि जाणण्याची प्रक्रिया लागते.


स्वरूप नुसतं आहे.


पण मग ते कुठे आहे ते दाखवता येत नाही म्हणून बुद्धानी त्याला शून्य म्हटलंय.


तुम्ही स्थिर झालात की ही न हालणारी स्थिती तुमच्या लक्षात येईल आणि मग हे देखील लक्षात येईल की आपण मुळात ती स्थितीच आहोत.

निसर्गदत्त महाराज नावाचा एक अद्भुत औलिया होऊन गेला ज्या तीन व्यक्तींना मी मानतो त्यात ते एक आहेत, जस्ट सी हिज वे ऑफ एक्सप्रेशनः

'असण्याची स्थिर अवस्था म्हणजे आनंद'! इतकं संक्षिप्त आणि बिनचूक वक्तव्य मी कधी बघीतलं नाही.

मी हे आणखी सोपं आणि काव्यात्मक केलंय, स्वतःची स्वतःशी एकरूपता म्हणजे आनंद!

कारण तुम्ही आणि ती स्थिती, कधीही, कुठेही आणि कोणत्याही प्रक्रियेनं वेगळे होऊच शकत नाही.

हा बोध म्हणजे अध्यात्माची फलश्रुती!

संजय