एका रिकामटेकड्या, ऐदी मुलामुळे कर्जबाजारी बनलेल्या बापाची खंत आहे ही विडंबनातून व्यक्त केलेली. मुलगी असून, आय टी त असून, भरपूर पगार मिळवू शकते; पण 'तू मात्र आयता बसून, खाऊन जाडी वाढवण्याखेरीज काही करत नाहीस मग तुझ्या नशिबात पडेल ती कामं करण्याखेरीज पर्याय नाही! सुदैव एकच- अशी मुलगी तुझ्या प्रेमात पडली (प्रेम आंधळे ?) आहे, आता तुझे लग्न माझी ऐपत नसतानाही मी लाउन दिले आहे! तू शिकला असतास तर- कष्ट केले असते तर - नोकरी केली असतीस तर -?? ' या विचारातून बाप उद्विग्नपणे म्हणत आहे.( आय. टी. ऐवजी कुठलीही नोकरदार, पण महत्त्वाकांक्शी मुलगी चालेल.) खुलासा पुरेसा आहे ना ! विडंबन वाचून अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद. राग नसावा.