संजयजी स्वतःची मानसिक ताकद वाढवण्यासाठी मेडिटेशन ठीक आहे पण त्याने प्रत्यक्ष संकट आले तर काय होणार? आपण दूर राहून बघतो. ज्यांना या प्रसंगांना प्रत्यक्ष तोंड द्यावे लागले असेल किंवा ज्यांच्या आप्तस्वकीयांचे जीव धोक्यात आले असतील त्यांना मेडिटेशन करून काय फायदा? ही वरवरची मलमपट्टी झाली. आतली जखम चिघळते आहे त्याचे काय? मेडिटेशन करून आपण संकटाकडे कदाचित निर्भयपणे बघू शकू पण आपलाच कोणी गंभीर जखमी अवस्थेत आपल्या समोर आला किंवा काही विपरित घडले तर तेव्हा हा निर्भयपणा टिकेल का? मी स्वतः गेली ११ वर्ष योगासने करते आहे. पण मुंबईवरच्या प्रत्येक हल्ल्यानंतर मी विलक्षण अस्वस्थ होते. कारण आज मी मुंबईपासून खूप दूर, नागपूरला आहे. पण माझे सर्व माहेर मुंबई आणि ठाण्यात आहे. अशा वेळी मी मेडिटेशन केले तरी मी त्यांना मरताना बघू शकेन का? किती वेळा मी हे समाधान मानायचे की चला यावेळीही माझे माहेर अभंग आहे? नाही संजयजी, तुम्हाला चूक ठरवण्याचा हा प्रयत्न नाही पण एक नक्की की यावर आता काहीतरी निश्चित उपाय हवा आहे. किती दिवस मुंबईकरांनी कुत्र्यासारखे मरायचे?