नीताजी,

पहिली गोष्ट : भावनिक होऊन कोणताही प्रश्न सुटू शकत नाही कारण भावना हा विचारांचाच अवेग आहे.

> संजयजी स्वतःची मानसिक ताकद वाढवण्यासाठी मेडिटेशन ठीक आहे पण त्याने प्रत्यक्ष संकट आले तर काय होणार? आपण दूर राहून बघतो. ज्यांना या प्रसंगांना प्रत्यक्ष तोंड द्यावे लागले असेल किंवा ज्यांच्या आप्तस्वकीयांचे जीव धोक्यात आले असतील त्यांना मेडिटेशन करून काय फायदा? ही वरवरची मलमपट्टी झाली. आतली जखम चिघळते आहे त्याचे काय? मेडिटेशन करून आपण संकटाकडे कदाचित निर्भयपणे बघू शकू पण आपलाच कोणी गंभीर जखमी अवस्थेत आपल्या समोर आला किंवा काही विपरित घडले तर तेव्हा हा निर्भयपणा टिकेल का?

=  जरी माझ्या कुटुंबावर आघात झाला तरी मी स्थिर नसेन तर मी ती सिच्युएशन कशी हँडल करू शकीन? फक्त माझं स्थिरत्वच मला त्यातून मार्ग दाखवू शकेल ना? दुसरा काय उपाय आहे?

>मी स्वतः गेली ११ वर्ष योगासने करते आहे. पण मुंबईवरच्या प्रत्येक हल्ल्यानंतर मी विलक्षण अस्वस्थ होते. कारण आज मी मुंबईपासून खूप दूर, नागपूरला आहे. पण माझे सर्व माहेर मुंबई आणि ठाण्यात आहे. अशा वेळी मी मेडिटेशन केले तरी मी त्यांना मरताना बघू शकेन का?


= योगासनं केल्यानी शरीर स्वस्थं राहील पण बोधाशिवाय स्थिरत्व अशक्य आहे.

> किती वेळा मी हे समाधान मानायचे की चला यावेळीही माझे माहेर अभंग आहे?

= हा हल्ला प्रातिनिधीक आहे. इथे कोण सुरक्षित आहे? माझा श्वास हा प्रतिसाद संपवेपर्यंत चालू राहील याची काय शाश्वती आहे? तो चालू राहील ही फक्त आपली कल्पना आहे, तो आपण स्वत:ला दिलेला दिलासा आहे. पण तो केव्हाही बंद पडू शकतो, त्यासाठी बाँबस्फोटच होणं आवश्यक नाही ही वस्तुस्थिती आहे.

आणि सगळं जरी व्यवस्थित चाललं तरी कधी ना कधी तरी कुणी तरी जाणारच ना? मग ते बाँबस्फोटानी गेलं काय किंवा हॉस्पिटलबेड वर गेलं काय एकूण प्रसंग तोच असणार ना? अशा वेळी तुमच्या स्थिरत्वाशिवाय दुसरं काय कामी येईल?

>नाही संजयजी, तुम्हाला चूक ठरवण्याचा हा प्रयत्न नाही पण एक नक्की की यावर आता काहीतरी निश्चित उपाय हवा आहे. किती दिवस मुंबईकरांनी कुत्र्यासारखे मरायचे?


= मला दहशतवाद काय जगातली सारी युद्धच संपावी असं वाटतं पण आपल्या इच्छेला कोणी विचारत नाही हे माझी सुज्ञता जाणते.

मी इथे युद्ध सर्वथा गैर आहे आणि ते कोणत्याही मानवी प्रश्नाचं, कोणत्याही कारणास्तव उत्तर होऊ शकत नाही म्हटलं होतं तर त्यावर साधं एकमत होऊ शकलं नाही इतके तर आपण (आपल्याला) योग्य वाटणाऱ्या कारणासाठी बदला घेण्याच्या मनस्थितीत आहोत. हीच मानसिकता दुसऱ्याची असू शकते आणि त्याला त्याचं कारण योग्यच वाटतं हे मात्र आपण नाकारतो.

तुम्ही नीट विचार करा मी तुम्हाला सुटकेचा अंतिम पर्याय सांगतोयं, प्रसंग आणि घटनेतून बाहेर कसं रहायचं ते सांगतोयं पण आपण भावनिक झालो की पुन्हा प्रसंगात गुंतून पडतो आणि मग बोध दुष्प्राप्य होतो. मग मृत्यू स्फोटानी असो की वार्धक्यानी, भूकंपानी असो की अपघातीनी, आप्ताचा असो की तिऱ्हाइताचा किंवा मग खुद्द आपल्या शरीराचा त्यानी काही फरक पडत नाही.

संजय