(मी इथे युद्ध सर्वथा गैर आहे आणि ते कोणत्याही मानवी प्रश्नाचं,  कोणत्याही कारणास्तव उत्तर होऊ शकत नाही म्हटलं होतं तर त्यावर साधं एकमत होऊ शकलं नाही इतके तर आपण (आपल्याला) योग्य वाटणाऱ्या कारणासाठी बदला घेण्याच्या मनस्थितीत आहोत.  हीच मानसिकता दुसऱ्याची असू शकते आणि त्याला त्याचं कारण योग्यच वाटतं हे मात्र आपण नाकारतो. )

संजयजी मुंबईतल्या चाकरमान्यांनी कोणाचे काय बिघडवले आहे म्हणून कोणी त्यांचा 'बदला' घ्यावा? ज्याला स्वतःच्या कुटुंबाशिवाय जग नाही तो कोणाच्या भानगडीत कशाला पडेल?

(आणि सगळं जरी व्यवस्थित चाललं तरी कधी ना कधी तरी कुणी तरी जाणारच ना?  मग ते बाँबस्फोटानी गेलं काय किंवा हॉस्पिटलबेड वर गेलं काय एकूण प्रसंग तोच असणार ना?  अशा वेळी तुमच्या स्थिरत्वाशिवाय दुसरं काय कामी येईल?)

संजयजी हे केवळ संतांनाच शक्य आहे आणि मी फार सामान्य गृहिणी आहे. माझ्या मुंबईवर जेव्हाही संकटे येतात तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझी माणसे उभी रहातात. इतरांशी माझे काही वैर नाही पण त्यांना मी ओळखत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी हळहळ व्यक्त केली जाते. पण माझ्या माणसांसाठी मात्र जीव कळवळतो.