आप्त-स्वकिय, हिंसा, सत्ता, बलवान-दुर्बल, योग्य-अयोग्य हे प्रश्न अनादी आहेत, पाच हजार वर्षापूर्वीच्या गीतेची सुरुवातच अर्जुनविषादयोगीनी आहे.
> संजयजी मुंबईतल्या चाकरमान्यांनी कोणाचे काय बिघडवले आहे म्हणून कोणी त्यांचा 'बदला' घ्यावा?
= बदला त्यांचा घेतला जात नाहीये, बदला सत्तासंघर्षातून घेतला जातोय. आज सत्ताधाऱ्यानी सात वेळा पृथ्वीचा संपूर्ण विध्वंस होऊ शकेल इतकी अणुसामुग्री निर्माण करून ठेवलीये, काय करू शकतो आपण? म्हणून मी लेखात सुरुवातीलाच लिहिलंय:
...आपण सत्य आहोत, नित्य आहोत आणि प्रसंगानं अस्पर्शित आहोत हे जाणणं हा एकमेव सूज्ञमार्ग आपल्याला उपलब्ध आहे मग इतर कुणी त्याला स्वार्थ म्हणो की आत्मकेंद्रितता, ते अज्ञानी माणसाचं परिस्थितीचं आकलन आहे.
>संजयजी हे केवळ संतांनाच शक्य आहे आणि मी फार सामान्य गृहिणी आहे
मी देखील सामान्य माणूस आहे आणि सद्यपरिस्थितीच जगतोयं फरक फक्त इतकाच आहे की परिस्थिती नेहमी अशीच राहणार, आज हा तर उद्या तो प्रश्न निर्माण होत रहाणार आणि आयुष्य कितीही सुरक्षित केलं तरी शेवटी मृत्यू येणारच हे मी जाणलंय. यापेक्षा थोडं पुढे जाऊन मला हे पण जाणवलंय की शेवटी मृत्यू येणार असं म्हणणं तितकंस योग्य नाही कारण तो कोणत्याही क्षणी आणि कशामुळेही येऊ शकतो, इतक्या अस्थिर आणि अशाश्वत जीवनात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे.
हे इतकं समग्रतेनी जाणवल्यावर मी शाश्वताचा शोध घेतलांय आणि निश्चिंत झालोयं. तुम्हालाही मी तेच सांगतोयं की तुम्ही देखील शाश्वतच आहात पण स्वतःला व्यक्ती समजत असल्यामुळे प्रसंगात सापडल्याचा तुम्हाला भास होतोयं. भासामुळे त्रास होतोयं पण भास आपलं निराकारत्व हिरावून घेऊ शकत नाही.
माझा लेख तुम्ही पुन्हा वाचा मग तुम्हाला समजेल की आपण म्हणजे फक्त 'असणं' आहे, 'कुणी तरी असणं' नाही मग हा बोध तुम्हाला कोणतिही परिस्थिती हाताळायला सक्षम करेल.
संजय