संपूर्ण विश्वच एक ऑरगॅनिक युनिटी आहे. त्यामुळे प्रत्येक घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीलाही अंशतः का होईना आपणच जबाबदार असतो. येथे प्रत्येक गोष्ट एकदुसऱ्याशी इतकी निगडीत आहे की त्यामुळे बऱ्याच वेळा ज्या गोष्टीशी आपला थेट संबध नाही अशाही गोष्टींचे चांगले/वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात.


परिणाम जेंव्हा आपल्याला अनुकूल असतो तेंव्हा त्याचे श्रेय आपण स्वतःकडे ठेवतो. मात्र परिणाम विरोधी स्थितित तसे होत नाही. हा मानवी स्वभाव आहे.

माझे वरील म्हणणे सोडून द्या. तुम्हीं तुमच्या मताप्रमाणेच राहा. पण ध्यानामुळे होणाऱ्या परिणामाची तीव्रता कमी होत असेल, आपण अधिक सक्षमपणे प्रसंग हाताळू शकत असू तर करायला काय हरकत आहे. संतही शेवटी माणसेच होती ना! ते माणसातुनच संतत्वाकडे पोहोचलेले आहेत हेही आपण ध्यानात घेतले पाहिजे असे मला वाटते.