भीती वाटणे हे स्वाभाविक आहे. आणि ते जीवनात महत्वाचे पण आहे.
परंतु ती कोणत्या प्रकारची भीती आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
एखाद्याच्या स्वभावावर, वागण्या-बोलण्यावरती, निर्णयांवरच विश्वास, प्रेम आणि अश्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. बऱ्याच वेळेस त्याचा स्वभाव त्यास पाईक होतो सुदधा.
पण क्वचित प्रसंगी मनात काय बदल होतील हे नक्की सांगता येत नाहीत. त्याच्या परिणामांची भीती ही आपोआपच बाळगली जातेच.