आपण अधिक सक्षमपणे प्रसंग हाताळू शकत असू तर करायला काय हरकत आहे.
= एकदम सही!
निराकारचा बोध तुमच्या विचारात क्लॅरिटी आणतो, जसजसे तुम्ही पूर्ण स्वरूपस्थितं होता (म्हणजे आपण शून्य आहोत हा तुमचा बोध सघन होतो) तसा तुमच्यावर प्रसंग आणि घटनांचा परिणाम शून्य होत जातो, तुम्हाला प्रसंग चित्रपटासारखा वाटायला लागतो.
जीवनात तीन प्रकारचे त्रास आहेत, शारीरिक, मानसिक आणि भावनिक.
जेवढे आपण शरीरापासून वेगळे आहोत हा बोध सघन होत जाईल तितका शारीरिक त्रास कमी होत जाईल, जेवढे विचार कमी होत जातील तेवढा मानसिक त्रास कमी होईल आणि जितकं विचारांचं हृदयाला भिडणं कमी होईल तितका भावनिक त्रास कमी होईल. कोणताही प्रसंग समर्थपणे हाताळायचं रहस्य यात दडलं आहे!
>संतही शेवटी माणसेच होती ना! ते माणसातुनच संतत्वाकडे पोहोचलेले आहेत हेही आपण ध्यानात घेतले पाहिजे असे मला वाटते.
= जेवढा माणूस संवेदनाक्षम तेवढी त्याला मृत्यूची चाहूल तीव्र, जितका माणूस समंजस तितकी त्याला परिस्थिती बदलण्यापेक्षा प्रसंगातून बाहेर पडण्याची आस जास्त!
सुनिल, सही अप्रोच आहे, लगे रहो.
संजय