पुन्हापुन्हा वाचतो. तुम्ही माझ्या लेखनातून नेमक्या गोष्टी उचलल्या आहेत हे बघून सार्थक झाल्यासारखं वाटतं.
> मी म्हणजे माझं शरीर नाही
> वेळ म्हणजे एक कल्पना आहे
> भविष्याची अनाठायी चिंता म्हणजे प्रत्यक्षात न घडलेल्या गोष्टींचा कल्पनाविलास
...ह्या क्षणाचा, आजचा आनंद हा भविष्यात काही मिळेल किंवा नाही ह्या चिंतेपेक्षा महत्त्वाचा हे स्वतःला समजावायला शिकले आहे.
याला आता एकच गोष्ट ऍड कर = हाच क्षण सदैव चालू आहे, अंधार आणि उजेड पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे होतोयं. प्रत्येक घटना फक्त वर्तमानात घडतेय आणि विलीन होतेयं तिचा स्मृतीशिवाय कुठे मागमूसही उरत नाही, घडून गेलेल्या प्रसंगाची वर्तमानात झालेली जाणिव म्हणजे भूतकाळ आणि पुढे घडणाऱ्या घटनेची वर्तमानात केलेली कल्पना म्हणजे भविष्यकाळ ! ज्याला हे समजलं तो स्वतः नित्य होतो, प्रसंगातीत होतो, घटनातीत होतो.
संजय