गतकाळातील आठवणी ... शारिरीक वेदना... भविष्यातील चिंता... त्यावरील उपाय योजना (स्वतःला समजावायला शिकणे वगैरे )...! 
हे सर्व  विचार मनात 'आता' चालू  असतात.

ह्या सर्वांचा अनुभव घेणारा 'बोध' (आपण/मी  आहे) सर्व विचारात स्थिर आहे.

त्या बोधाचा अनुभव केल्याने आपण वर्तमानात येतो.

विचारांची जागा "आपण आहोत" हा बोध घेतो, त्यामुळे विचार अखंडीत (तीरोहित) होतात आणि आपण निर्विचारात येतो.

याचे सतत स्मरण हीच साधना आहे. 

साधना ("आपण आहोत" हा बोध) आणि साध्य (निर्विचार/निराकार ) एकाच वेळी  उपलबद्ध आहे.

तुम्हीं जे काही कराल किंवा तुमच्याबाबत जे काही होईल ह्या सर्वांच्याबाबत साक्षी राहणे शक्य आहे. फक्त अनुभवचा अनुभव करावयाचा आहे.