अनुभव वाचून राग आला.. पण असे शिक्षक मुलांना वर्तुनकीबद्दल काय धडे देतील असा प्रश्न उभार राहिला.
तुमचा प्रश्न मुख्याध्यापकाकडे मांडण्यापर्यंतच तुम्ही करू शकता.. यापुढे मार्ग नाही ...
तरीही एक सांगतो..
अश्या व्यक्तींना अश्या गोष्टींमध्येच जास्त रस असतो.. यांना धडा शिकवुया चांगला असे आपले म्हणणे असते(मनात).. पण यातुन फक्त त्रासच सहन करावा लागतो, उलट हे अश्या माणसांना हवेच असते.. आणी मग तुम्ही असे केले हे नव्याने ते दाखवतात.. (जुन्या गोष्टी लपवुन)
त्यामुळे दुर्लक्ष करून आणि आपले काम चोख पार पाडून आपण त्यांना उत्तर द्या. दुर्लक्ष केल्याने त्यांना सर्वात जास्त हर्ट होते.
आणि एक ... मारग शांततेचा असला तरी स्पष्ट वक्ते पणा मात्र जरुर ठेवा.. अश्या व्यक्तींनी काही बोलले.. लुडबुड केली तर त्याचवेळेस स्पष्ट बोलत चला.
म्हणजे जर सांगणाबाबतीत काही बोलले तर लगेच ऐकवा, तुमला असली उठाठेव करायची असेन तर तुम्ही रीतसर का नाही घेत तुमच्या हातात हा विभाग.. वगैरे.
असो मला कधीही असा अनुभव आलेला नाही.