सर्वसामान्यांच्या वागण्या बोलण्यातील विरोधाभास आपण उत्तम रितीने मांडला. अण्णांची टोपी मात्र कोरीच होती कारण त्या टोपीखाली खरेखुरे अण्णा होते! ज्यांचे हाती अडवणूक करून फायदे घेण्याची सत्ता आहे अशांविरुद्ध्ची लढाई ही या महायुद्धातील अगदी पहिली लढाई आहे. ही बाब नजरेआड होऊ नये. तिला आपण कुणीही कमी लेखू नये. मार्ग फार फार कठीण आणि लांबचा आहे. पण दिशा योग्य नाही का?