आपल्या लेखाचे प्रयोजन आणि त्यातला मुद्दा समजला होता. फक्त 'आम्ही' सामान्य जनतेने तो समजावून घेतला नाही. आम्ही समजूत करून घेतली की ही लढाई आम्हांला 'आम्ही' वगळून कुणा तिसऱ्याविरुद्ध लढावयाची आहे. आम्ही सर्व अत्यंत स्वच्छ, पवित्र आहोत आणि (आमच्यापासून वेगळे असे) ते वाईट्ट, दुष्ट वगैरे आहेत.

एकंदरीत, हे आंदोलन यशस्वी झाले असे मानणे ही स्वतःची फसवणूक आहे. सरकारे पडतील,राहातील,येतील‍, जातील. जोपर्यंत आम्ही, 'ते' धरून आम्ही, बदलत नाही तोपर्यंत काही खरे नाही.

आमची फसगत झाली या अर्थाने 'आम्हांला टोपी घातली' असा शब्दप्रयोग केला आहे. आम्ही तर असे अडाणी, बिचारे(मुकी बिचारी कुणीही हाका प्रमाणे) सदाचेच आहोत. म्हणून 'भिकारी' शब्द वापरला.

अर्थात फसवणूक अण्णांनी केलेली नाही. आम्ही दिपून गेलो, आम्ही फसून राहिलो.