श्री. मयुरेश वैद्य,

त्या काळचा भारत, त्या काळचे इंग्रज राज्यकर्ते आणि आजचा इराक, आजचे आक्रमणकर्ते यांची मानसिकता यात बराच फरक आहे.या दोन वेगवेगळ्या समस्या आहेत.

आपण म्हणता ती कामे ब्रिटिशांनी नक्की कोणत्या उद्देशांनी केली असावीत ?

देश आपल्या अधिपत्याखाली घेतल्यावर, आता इथे आपण कायम  राहाणार आहोत, आपण राज्यकर्ते आणि ही आपली प्रजा अशीच भावना त्या काळी इंग्रजांना असणार. एखाद्या कंपनीत नविन 'व्यवस्थापन' आल्यावर ते जसे आपल्या गरजे साठी, कामगारांना खुश करण्यासाठी (म्हणजे त्यांनी 'संप' वगैरे करू नयेत म्हणून), उत्पादकता वाढविण्यासाठी आणि मार्केटमधिल आपली 'प्रतिष्ठा' वाढवण्यासाठी, कंपनीतल्या जून्या त्रूटी दूर करून नव्या नव्या संकल्पना आकारास आणते त्यातलाच तो प्रकार असावा. यात इंग्रजांचा स्वार्थ नक्कीच होता (तसे ते व्यापारीच) पण त्याच बरोबर कंपनी 'नावारूपाला' आणणे हाही उद्देश होताच. 

ब्रिटिश नसते तरीही, भारतात शाळा-कॉलेज-विद्यापीठे आलीच असती. भारतातला अणूसंशोधन प्रकल्प ब्रिटिशांनी चालू केला होता का ? टाटांचे प्रकल्प आपले भारतीयांचेच होते. सुधारणा व्हायला थोडा वेळ लागला असता. पण ज्या सुधारणा झाल्या असत्या, त्या ह्या मातीतून घडून आल्या असत्या.

अगदी मान्य. तेवढी कुवत आपल्यात होतीच. श्री. भोमेकाका यांना दिलेल्या प्रतिसादात मला हेच म्हणायचे आहे.

आपल्यावर सुधारणा लादल्या गेल्या नसत्या.
मयुरेश, लादल्या गेल्याचे दुःख कशा करता? 'लादल्या गेल्या' हा शब्दप्रयोग तसा नकारात्मक आहे. इंग्रजांच्या व्यापक दृष्टीकोनामुळे सुधारणा लवकर झाल्या असे म्हणता येईल. पण इंग्रज नसते तर त्या झाल्याच नसत्या असे म्हणणे चुकीचे ठरेल.

ब्रिटिशा मनाने मोठे की स्वार्थी-धूर्त आणी कपटी होते ?

ते व्यापारी वृत्तीचे आणि देशाभिमानी (इंलंड) होते. चरायला कुरण मिळाले आहे. मनमुराद नफा कमवून आपल्या देशाला श्रीमंत करा असा त्यांचा उद्देश होता. हा परमार्थ साधताना वैयक्तीक स्वार्थ साधण्यातही त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. 'ईस्ट इंडिया कंपनी'ला लूटणारे अनेक इंग्रज अधिकारी होते.
कपटतंत्रही त्यांनी वापरले. शिवाजी महाराज पन्हाळगडावर कोंडले गेल्यावर, महाराजांच्या शत्रूला मदत करणार नाही असे दिलेले वचन विसरून ते शत्रू फौजेत (कुतुबशाही, मला वाटतं) बिनदिक्कत आपल्या तोफा घेऊन सामिल झाले आणि त्यांनी गडावर तोफ गोळ्यांचा मारा केला.

असे 'ते' इंग्रज 'सर्वगुण(दुर्गुण)संपन्न' होते.