'पचेल रुचेल ते खावे ' - असे सुटसुटित सूत्र स्वा. सावरकरांनी सांगितले आहे ते योग्य वाटते. मुळात खाण्यापिण्याच्या संवयी त्या त्या प्रदेशातील हवामान, पिके इ. अनेक बाबींवर ठरत असते. मांसाहारी लोकात सात्त्विक व्रूत्ती नसते असे म्हणायचे तर ते सहज खोडून काढता येईल. त्यामुळे जे खाता ते तुम्हाला पचते का आणि पचत असेल तर आवडते का? हा साधा नियम व्यवहार्य आहे. खाण्यापिण्याच्या विषयी आरोग्य शास्त्राची मदत घेणेही योग्य आहे.