लेखनामधून खालील गोष्टी सुचवायच्या आहेत. 
१) भक्ती ही intangible असते कारण ती वस्तू नाही तर भावना आहे. आणि भक्ती मग ईश्वराची असो, कुठल्या कलेची असो किंवा व्यक्तीची असो ती निर्मळच असते.
--> एकदम योग्य ओळखलंत ! 

२) गजानन महाराजांच्या भक्तांनी त्यांचे अनुकरण करून शाकाहारी व्हावं हे समजण्या सारखं आहे.
--> त्यांनी मांसाहार करूच नये असेही काही नाही. पण उगाच मी स्वामीची / गजानन महाराजांची भक्ती करतो म्हणून मी गुरुवारी मांसाहार करणार नाही (किंवा श्रावण पाळणे वगैरे .. ) हे उमगत नाही. (मी तर विचारीन असे का करतात लोक ? त्यानं नक्की काय साध्य होते ? ते स्वतःला फसवत आहेत की आपल्या गुरुंना ? )
सामिष आहार ग्रहण करणे अयोग्य आहे असेही मला सांगायचे नाही. आणि सामिष आहार करणारे "घमेंडखोर" (हर्षल ने दुरुस्ती सुचवल्याप्रमाणे) असेही काही संगायचे नाही. आणि लेखात असे दर्शवण्याचा कुठे प्रयत्न केला आहे असही नाही. 

इतर प्रतिसादामुळे लेखात जे मांडायचे आहे ते अगदी च बाजुले पडलेले दिसत आहे. 
प्रतिसादाबद्दल आभारी आहे