>>दहावी, बारावीचा उत्तीर्णता-दर आपण दरसालच्या परीक्षांत पाहतो. तो सुमारे ५०% च्या आसपास असतो. त्यातील बव्हंशी विद्यार्थी इंग्रजीत नापास होतात. त्यातील कित्येकांना पुढे शिक्षणच घेता येत नाही. तदनंतर उर्वरित आयुष्यात इंग्रजीचा वापर करणेही त्यांना अनिवार्य नसते. << याला मार्ग म्हणजे इंग्रजी शिकवण्यासाठी जास्त पगार देऊन उत्तम शिक्षणाची सोय करणे.  पुस्तकांची भाषांतरे करून प्रश्न सुटणार नाहीत. इंग्रजीत प्रत्यही दोनतीन नवीन तांत्रिक पुस्तके बाजारात येणार. त्यांचे परत भाषांतर करावे लागणार, याला अंत नाही.  उत्तम इंग्रजी   शिकणे फार कमी त्रासाचे आणि कमी खर्चाचे आहे.

>>उर्वरित आयुष्यात इंग्रजीचा वापर करणेही त्यांना अनिवार्य नसते.<< ज्यांना आयुष्य आपल्याच विहिरीत डुबक्या मारीत काढायचे आहे,  त्यांना खरोखरच इंग्रजी  शिकायची गरज नाही. इंग्रजी वापरणे म्हणजे केवळ इंग्रजी लिहिणे-बोलणे नाही, तर इंग्रजी समजणे.  हे पदोपदी लागते.

बारावीपर्यंतच्या शिक्षणात कमीत कमी पाच भाषा शिकायला मिळाल्या पाहिजेत. हिंदी, इंग्रजी, संस्कृत या त्यांतल्या तीन. एक अन्य भारतीय भाषा आणि एक परदेशी  भाषा किंवा अधिकची  देशी भाषा.  तीन भाषांचे उत्तम ज्ञान आणि दोघींचे निदान कामचलाऊ. भाषा शिक्षकांना जास्त पगार मिळायला लागला की उत्तम शिक्षक मिळतील.

जर्मनी-जपान या टिचभर देशांची तुलना भारतासारख्या अवाढव्य देशाशी करण्याचा निष्कारण प्रयत्न करू नये.  आणि त्यांही देशांत प्रत्येक रहिवाशाला त्याच्या मातृभाषेतून पुस्तके अभ्यासायला मिळत नाहीत.