विवेचन. पण विवाह ह्या संकल्पनेचा इतका खोलात जाऊन फार थोडे लोक विचार करीत असतील.. नाही का? तुम्ही म्हणता की
एका अर्थानं तुमचा आनंद शेअर करायला तुम्ही जर जगातली कोणतीही व्यक्ती निवडायची म्हटली तर पहिला पर्याय तुमची पत्नी असते!... असा विचार किती लोक करतात...?. मला तरी असा कधी अनुभव नाही. आई-वडिल सर्वकाळ ज्यांचे मन व्यापून उरले आहेत, अशा व्यक्तीला आनंदाच्या क्षणी पहिल्यांदा आईची आठवण येईल! लग्न हे आईवडिलांना सुख लाभावं म्हणून केलेली व्यवस्था आणि नंतर स्वतःचा विचार अशीही विचारसरणी असू शकते.
वैयक्तीक मतं आणि अनुभव बाजूला ठेवायचे म्हटले तरी लग्न या बाबीला अनेक पैलू आहेत जसे, दोन कुटुंबं, त्यांच्या संयुक्त जबाबदाऱ्या, मुले, सणवार, अर्थार्जन आणि अपेक्षा.... यात मुळात काही 'समन्वय' वगैरे असलाही तरी तो डायल्यूट व्हायला कितीसा वेळ लागणार...? कठीण आहे सारे.
अर्थात तुमच्या सुरेख (परंतु 'आदर्श सिच्युएशन') लिखाणाचे महत्त्व या गोष्टींनी कमी व्हायचे कारण नाही.