१) हा विषय थोडा नाजूक आहे पण समजला तर अत्यंत उपयोगी होईल. माझं म्हणणंय की सर्व नाती मानवी कल्पना आहेत कारण सर्व नाती विवाहातून निर्माण होतात आणि विवाह हीच कल्पना आहे.
आई आणि पत्नी या नात्यात (दोन्ही मानलेलीच आहेत) पत्नी हे नातं तीन पैलू घेऊ शकतं: एक, जी तुमची काळजी घेते अशी आई, दोन, जीची तुम्ही काळजी घेता अशी मुलगी आणि तीन, जिच्याशी तुम्ही काहीही शेअर करू शकता अशी सखी! तुम्ही ते नातं काय लेवलला नेता, किती गहीरं करता यावर त्याची खुमारी आहे.
आणि याहून ही मजा पुढे आहे, तुम्ही तुमच्या पत्नी बरोबर आनंदात असाल तर तुमच्या आई वडीलांची देखील उत्तम काळजी घेता (आणि हे मी तुम्हाला एकत्र कुटुंबात राहून सांगतोयं). जिथे पती-पत्नीत कलह आहे तिथे आई-वडीलांशी रिलेशन्सही आपसूक बिनसतात, किंवा द अदर वे (आणि हे हमखास आहे) जिथे आई-वडील प्रथम आणि पत्नी नंतर अशी मानसिकता आहे तिथे पती-पत्नीत विद्रोह होतोच आणि हे अनेक सेपरेशन्सचं कारण आहे किंबहुना तिथे एकत्र कुटुंब राहूच शकत नाही.
२) >वैयक्तीक मतं आणि अनुभव बाजूला ठेवायचे म्हटले तरी लग्न या बाबीला अनेक पैलू आहेत जसे, दोन कुटुंबं, त्यांच्या संयुक्त जबाबदाऱ्या, मुले, सणवार, अर्थार्जन आणि अपेक्षा.
= तुम्ही एक धागा जुळवा, तुमचे सर्व धागे जुळलेच म्हणून समजा.
ज्याचं पत्नीशी जमलंय तो इतका तरल होतो की दोन्ही कुटुंब, मुलाचं संगोपन (मुलांचं नाही कारण एक कुटुंब एक मूल ही माझी धारणा आहे आणि ते सहज आणि धमाल आनंदाच आहे), सण (हे तर एकदम उत्साहाच काम), अर्थार्जन (ज्याला खऱ्या अर्थानी भवताप म्हणायला हवा) हलकं होतं कारण या नात्यातलीच उर्जा घेऊन तुम्ही घराबाहेर पडता आणि अपेक्षा? नाही मजा, कधी तुम्ही तिचं ऐकता कधी ती तुमचं ऐकते, कधी भडका उडतो पण मग पुन्हा कुणी तरी तारा जुळवतं की दुसरा ही साथ देतो, मग पुन्हा रंगत सुरू!
३) माझं एकच सांगणंय, मी जगण्याचा एकदम वेगळा अँगल दिलायं आणि ती कवी कल्पना किंवा अपवादात्मक स्थिती नाही, मी स्वत: जगून, भर एकत्र कुटुंबात राहून, अगदी घर घेण्यापासून, संगोपन, दोन्ही कुटुंबातली आजारपणं, शस्त्रक्रिया, मृत्यू आर्थिक तरतूदी, पराकोटीचे कलह, स्त्री देह आणि मानाचे शारीरिक, मानसिक, भावनिक वगैरे सर्व पैलू असं सर्वच्या सर्व बघून आणि फुल जगून हा लेख लिहिलाय! तुम्ही अजून देखील तारा जुळवा, तुमच्या पत्नीला हा लेख वाचायला द्या, तुम्हाला निश्चीत मजा येईल, अजून वेळ गेलेली नाही.
संजय