प्रथम तुमचे इतके दिलखुलास प्रतिसाद येतायंत की मी भरून पावलोयं, धन्यवाद!

नित्शेचं आभाळावर लिहून ठेवावं असं वाक्य आहे : ‘नॉट टू यूज द अदर इज दि हायेस्ट मॉरॅलिटी! ’

या वाक्यानी मी स्वत:चं पूर्ण आयुष्य बदलवलेलं आहे.

जस्ट सी, सर्व नाती कल्पना आहेत पण ज्या नात्याचा फायदा होतो ती टिकतात. जी नाती निव्वळ जवाबदारी म्हणून ओढली जातात त्यात लोकलज्जेचं भय असतं आणि अशा नात्यातून अनिवार्यपणे अपेक्षा निर्माण होतात. जेव्हा तुम्ही दुसऱ्याशी पूर्ण प्रामाणिक असता तेव्हा तुम्ही दुसऱ्याला कधीही वापरत नाही, तुम्ही एक दुसऱ्याशी शेअर करता. काय आहे या प्रामाणिकपणाची कसोटी? तर तुम्हाला काय हवंय याची पहिल्यांदाच दुसऱ्याला पूर्ण कल्पना द्या, तुमचा हेतू कधीही लपवू नका.

समर्पणात तुम्ही ‘दुसरा प्रथम’ अशी भूमिका घेता आणि त्यातून दोन गोष्टी हमखास होतात : एक, दुसऱ्याकडून अपेक्षा निर्माण होते आणि दोन, यू आर टेकन फॉर ग्रांटेड, जर तुम्ही लोकांच्या उपयोगी पडला नाहीत तर आतापर्यंत तुम्ही जे केलं ते सर्व फोल होतं!

जेव्हा तुम्ही दुसऱ्याला वापरणार नाही असं मनाशी ठरवून टाकता तेव्हा तीन गोष्टी घडतात : एक, स्वत:च्या प्रामाणिकपणामुळे तुम्हाला स्वत:बद्दल आदर राहतो, दोन, दुसऱ्याला नाही म्हणायची तुम्ही संधी दिलेली असते त्यामुळे दुसऱ्याची तुमच्याकडून अपेक्षा राहत नाही, आणि तीन तुम्हाला दुसऱ्याबद्दल कृतज्ञता वाटते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रसंग जिथल्या तिथे संपतो त्याचा लेफ्टओवर राहत नाही.  

(तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण देव आणि भक्त ही भक्तानी केलेली कल्पना आहे, ते नातं नाही त्यामुळे तो टाइमपास भक्त कितीही वेळ करू शकतो.)

संजय