मी जेव्हा ओशो वाचायचो आणि ऐकायचो तेव्हा सर्द होऊन जायचो, काय रेंज आहे या माणसाची, आध्यात्मातल्या कोणत्याही पैलूच्या शेवटच्या टोकाला जा हा माणूस तिथे उभायं!

आज मी मागे वळून बघतो तेव्हा लक्षात येतं की एकदा सत्य कळलं की जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा आपसूक उलगडा होत जातो. माझ्या एक्कावन्न लेखात मी प्रत्येक वेळी नवा विषय मांडलांय आणि मजा म्हणजे मी जितके दिवस हयात असेन तितके दिवस प्रत्येक वेळी वेगवेगळ्या विषयावर लिहू शकेन, फक्त सुचायचा अवकाश!

यात आणखी एक पैलू आहे, या सर्व लेखांवर मिळून चारशेच्यावर प्रतिसाद आहेत आणि एकही प्रश्न अनुत्तरित नाही, प्रत्येक लेखावर शेवटचा प्रतिसाद माझायं आणि कुठेही विरोधाभास नाही. हे सगळं डॉक्युमेंटेड आहे आणि यात कुठेही एका शब्दाचा फेरफार करता येत नसतांना ही स्थिती आहे!

आणि काय असेल याचं रहस्य? कॅन यू इमॅजीन? फक्त एक गोष्ट: सत्य एकच आहे!

संजय