गेलीये!
= एकदा सत्य कळलं की जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा आपसूक उलगडा होत जातो
> अगदी अगदी. मला परमेश्वर ही संकल्पना आहे हे उमजल्यानंतर देव, धर्म, दानव, भूत, कर्मकांड, भूत-भविष्य इ. च्या फोलपणाचाही उलगडा झाला. आता त्यासंदर्भातील सर्व प्रकारांकडे मी अगदी अलिप्तपणे पाहतो व या कशाचाही माझ्यावर तीळभरही परिणाम होत नाही. मला त्यापासून मुक्ती मिळाली आहे असेच मी म्हणेन. अगदी असेच, सत्याचा उलगडा झाल्यानंतर जीवनातल्या इतर गोष्टीचा आपसूक उलगडा होत जात असणार यात मुळीच शंका नाही.
= देव ही कल्पना आहे हा बोध व्हायला मला हयात घालवावी लागली! आणि कॅन यू बिलीव्ह? आता मी कुणालाही काही पटवून देत नाही, मी स्वत: इतका निश्चींत असतो की दुसऱ्याला पटलं तर त्याचं भलं नाही पटलं तर चालू दे ओढाताण! काय करणार आपण?
तुम्हाला माहितीये कळस, माणसाचं सर्व आकलन त्याच्या बुद्धिमत्तेवर आणि ओपननेसवर आहे, एकवेळ बुद्धीमत्ता थोडी कमी असली तरी चालेल पण ओपननेस नसेल तर माणूस तोचतो मूर्खपणा आयुष्यभर करत राहतो. आपण किती एनर्जी ,वेळ आणि पैसा व्यर्थ घालवतोयं त्याच्या शेवट पर्यंत लक्षातच येत नाही.
>फक्त एकच आहे की मला जरी "परमेश्वर ही संकल्पना आहे" हे दुसऱ्याला समजवण्यासाठी आत्ता अगदी सोपे वाटत असले, तरी ते प्रत्यक्षात दुसऱ्याच्या पचनी पाडणे अत्यंत कठीण आहे, जवळजवळ अशक्य आहे असेच लक्षात आले आहे.
= तुमची एनर्जी आणि वेळ वाया जाईल, संबंध बिघडतील, लोक स्वत:ला शहाणा समजतो म्हणतील, तुम्ही कुणाला काही पटवून देऊ नका
> ज्याचे त्यालाच ते "उमजावे" लागते, त्याचा बोध व्हावा लागतो. कारण आपापल्या (चुकीच्या) धारणा इतक्या पक्क्या आणि खोलवर बिंबलेल्या असतात की त्यामुळे सत्य समजूनही बोध न झाल्याने चुकीच्या धारणांपासून मुक्ती मिळत नाही.
= क्या बात है! तुमच्या आता लक्षात आलं असेल की मला इतकं निर्विवाद आणि मुद्देसूद का लिहावं लागतं! आणि इतक्या सोप्या, साध्या, लोकांचं जीवन सुखाचं व्हावं अशासाठी केलेल्या लेखनाला नुसतं सातत्य ठेवायला मला किती प्रयास झाला असेल. मला मजा वाटत होती म्हणून मी लिहिलं नाहीतर हे सातत्य टिकलंच नसतं.
आता असाच बोध वेळ हा भास आहे हे जाणून घेण्याकडे लावा आणि तुमचं जीवन किती स्वस्थ होतं ते पाहा!
संजय