अरुंधती यांचे कुतूहल योग्य आहे. तसे सुरवातीला सर्वच मानवजात अंगावर कपडे न घालताच वावरत होती त्यावेळीच्या पुरुषांचे मन विचलित होत नसावे कपड्यांची उपलब्धता नसल्याने गरीब स्त्रीने एकाद्या पटकुरावर आपले शरीर झाकणे किंवा आदिवासी वगैरे स्त्रियांनी शरीराचा वरचा भाग उघडा ठेवणे या गोष्टीमुळेही त्यांच्याकडे पाहणाऱ्या पुरुषाचे मन विचलित होणे शक्य आहेच. पण त्यात त्या दोघींचा - एकीचा दारिद्र्यामुळे व दुसरीचा प्रथा म्हणून - नाइलाज असतो त्यात त्याना व्यक्तिस्वातंत्र्याचा टेंभा मिरवायचा नसतो, पण  भरपूर व अघळपघळ कपडे घालण्याची ऐपत असून केवळ आम्हाला कोणत्याही प्रकारचे  कपडे घालायचे स्वातंत्र्य  आहे  अशा आविर्भावात आखूड कपडे घालण्याचे कारण नाही इतकेच.  टेनिस खेळणाऱ्या स्त्री खेळाडूंनी लांबलचक कपडे घालावे असे कोणी सुचवणार नाही ़उलट त्या खेळाडूंनी स्वतःच खेळताना वर उडून शरीराच्या काही भागाचे अनावश्यक प्रदर्शन होऊ नये म्हणून स्कर्ट न वापरता  शॉर्टस  वापरण्याचा आग्रह धरला आहे.