तसेच इंग्रजांमुळे आपल्याला ज्ञान प्राप्त झाले हेही पटत नाही. अशा विधानात तथ्यांश असला तरी ते पूर्ण सत्य नाही.
इंग्रजांमुळे ज्ञान नाही तर आधुनिक ज्ञानाचे दरवाजे आणि ते मिळवण्याचे मार्ग लवकर प्राप्त झाले. जे मुसलमानी अमलात (म्हणून अफगाणिस्तान)बिलकुल झाले नसते. पोर्तुगीज आणि एतद्देशीय(पेशवे...?) अमलात कदाचित झाले असते.
इंग्रजांकडून आपल्याला आधुनिक व्यवस्थापन, आधुनिक समाजकारण शिकायला मिळाले असे मला वाटते.
"आधुनिक" हा नेमका शब्द (कीवर्ड) आहे असे वाटते. आपल्या ग्रंथात सगळे काही लिहिले आहे, असा माझाही विश्वास आहे. पण त्यामुळे औद्योगिक क्रांती भारतात झाली नाही. युरोपात झाली.
आपल्या देशाच्या बाबतीत वरचेच एक उदाहरण वापरायचे...
मालकीणबाईंनी स्वतःच्या सोयीसाठी गड्याला गाडी चालवायला शिकवली पण गडी शहाणा निघाला. गाडी चालवण्याबरोबरच चार जास्ती गोष्टी शिकला. मुलाला शिकवले आणि अभियंता केले! मालकीणबाईंकडे नोकरी/गुलामी का करावी लागली? बाईंनी त्याला स्वैपाकाला ठेवले नाही? यावर चर्चा होतच राहील. पण गड्याच्या प्रगतीला तात्कालिक कारण ती नोकरी/गुलामी होती. त्याला गड्याच्या प्रगतिशीलतेची, परिश्रमांची आणि शिक्षणाची जोड मिळाली असे वाटते.