हर्षवर्धनजी,
आपण ह्या लेखमालेच्या उद्देशाचे खरेखुरे रसग्रहण केलेले आहेत असे मला वाटते. शून्याधारित प्रतिशब्द-निर्मितीचे काम कायमच सुरू राहणे, हे भाषेच्या जिवंतपणाचे द्योतक आहे. मग पर्यायी शब्द रोज वापरात, शिक्षणात, व्यवहारात रूढ करण्याचे, मान्य करण्याचे काम संबंधित अधिकारी व्यक्ती करत राहतीलच.
परंतु प्रतिशब्द-निर्मितीचे काम बंद होण्याचे जे दुष्परिणाम आज आपण अनुभवतो आहोत, त्यातला एक म्हणजे आपण
"आपल्याच भाषेत उच्च शिक्षण उपलब्ध असावे"
असेही वाटू नये, इतक्या पातळीप्रत येऊन पोहोचलेलो आहोत, हा आहे.