हा लेख प्रकाशित झाल्यावर माझ्या इतक्या मित्रांचे फोन आले आणि सगळ्यांना मी एकच सांगीतलं 'तुमच्या पत्नीला वाचायला द्या, हा सहजीवनाचा विषय आहे'.
मजा अशीये की दोघांपैकी एकाला जरी उमजलं तरी तो सातत्यानी प्रयत्न करून वैवाहिक जीवनाचा रंग बदलू शकतो पण दुसऱ्याचा रिसपॉन्स असेल तर बहार येते आणि मी वास्तविक जीवनाविषयी, सगळं जगून, अनुभवून लिहिलंय, यात कोणताही कल्पनाविलास किंवा दुमत होईल असा मुद्दा नाहीये.
माझा असा अनुभव आहे की एखादी गोष्ट समजली की आपल्याला मग त्याविपरित जाताच येत नाही. एकदा विवाह ही कल्पना आहे अशी खूणगाठ मनात बसली की मग कुणीही कितीही सांगो आपण तिच्याबरोबर नेहमी लाईट मूडमध्ये असतो, आपल्यासाठी ती सखी होते.
स्त्रिया बहुदा प्रापंचिक गोष्टी फार मनावर घेतात, दे आर टू सिरियस अबाऊट एव्हरी थिंग म्हणून मला वाटतं की त्यांना या संबंधातली मजा कळली, तो लाईटनेस प्रसंगाप्रसंगात आणता आला तर सहजीवनची मजा काही औरच होईल.
>प्रतिसाद वैयक्तीक होण्याच्या भीतीने अधिक नाही लिहीत!
= प्रत्येक गोष्ट वैयक्तिकच असते आणि आपण आपले व्यक्तिगत अनुभवच शेअर करतो फरक इतकाच आहे की जेव्हा ते लेखन सर्वांना उपयोगी व्हावं म्हणून असतं तेव्हा वाचकांनी देखील त्यांचे व्यक्तिगत अनुभव सांगीतले तर ती सर्वोपयोगी विधायक चर्चा होते. ललित लेखनाची गोष्ट वेगळीये, ते कल्पना आणि अनुभवाचं मिश्रण असतं, तिथे आपण रिलेट झालो तर ते आवडतं, नाही झालो तर सोडून देता येतं.
संजय