ही वृत्ती हा पुरुषाचा दोषच आहे ज्ञानदेवांच्यापासून "जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो "  अशी प्रार्थना केली तरी ही वृत्ती कशी बदलणार ?विश्वामित्र सुद्धा त्या वृत्तीला बळी पडले आहेत तेथे इतरांची काय कथा? म्हणून ती वृत्ती बदलण्याची वाट पाहण्या ऐवजी तिला खतपाणी न घालणे श्रेयस्कर.