सगळे भारतीय निःस्वार्थी, सगळे मुस्लिम धर्मवेडे, सगळे इंग्रज स्वार्थी असे गृहित धरायला लागलो तर काहीच निष्पन्न होणार नाही.
इंग्रजांनी त्यांच्या इतर वसाहतींपेक्षा भारताला वेगळे वागवले का? इतर वसाहतीतल्या लोकांपेक्षा भारतीय कसे वेगळे होते? स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणखी कुठल्या वसाहती लढल्या, कुठल्या नाहीत, का? सध्या त्यातले कोण किती पाण्यात (!) आहेत? अशा प्रश्नांची उत्तरे पाहिली पाहिजेत.
इंग्रज नसते तर, कुठले पर्याय उपलब्ध होते याबाबतची माहिती मला विनायक, सर्वसाक्षी प्रभृतींची विवेचने वाचून समजली. त्यामुळे कोणाचीही वसाहत झालीच नसती तर काय झाले असते याबद्दल माझे काहीच मत नाही.
पण इंग्रजी वसाहतींनी इतर (फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज) वसाहतींच्या मानाने जास्त प्रगती केली आहे हे कुणालाही मान्य व्हावे. सोप्पे उदाहरण अमेरिका (ची सं. रा.).