हे झाले आहे खरे. पण याला कारण असेही असू शकते की पिढ्यानपिढ्या घरी दारी विशेषत: सासरी स्त्रीवर जे अत्याचार झाले त्यांचा सूड म्हणून स्त्रिया हे करत असतील. कारण अजुनही आपल्याकडे हुंडाबळी जातच आहेत. आता जेव्हा पुरुषांवर शेकले तेव्हा त्यांना जाग आली. सुनेला छळण्यात घरच्या पुरुषांचाही तेवढाच हात असतो. बघा बातम्या. सासू आणि नणंदे बरोबर सासरा आणि दीरही सामिल असतात. जेव्हा स्त्रीला कोणी पाठीराखाच नव्हता तेव्हा स्त्री निमूटपणे बळी जात होती. आता कायद्याने आधार दिला आहे. अर्थात त्याचा गैरवापर करायला नकोच. कारण अन्याय हा स्त्रीवर होवो किंवा पुरुषावर तो अन्यायच आहे. पण आता पुरुषांनी जरा विचार करावा की तेव्हा त्या त्या स्त्रीची नेमकी भावना काय असेल? कोणी सुखासुखी बळी जात नाही. आता कोणी हेही म्हणेल की आम्ही थोडाच अन्याय केला आहे? आम्हाला शिक्षा का? पण ही एक सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. आता बायकोने घराबाहेर काढणे हे नवऱ्याला अपमानकारक वाटते. पण तिला मूल होत नाही किंवा मुलीच होतात किंवा तिच्या माहेरच्यांनी पैसे दिले नाहीत किंवा जावयाचा मानपान केला नाही इ. कारणांनी जेव्हा स्त्रीला घराबाहेर काढले जात होते तेव्हा तिच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्यायही  काय होता? अशा वेळी कधी नवरा तिच्या पाठीशी उभा राहिला का? कालाय तस्मै नमः! दुसरे काय?