महाराष्ट्र टाइम्समधील बातमीत लग्न झालेल्या जोडप्यातील स्त्री व पुरुष यांच्यातील बेबनाव व  त्याच्या  परिणामातील पुरुषाची आजची स्थिती याविषयी उल्लेख आहे तो सरसकट स्त्रीजात व पुरुषजात यांचाशी संबंधित नाही. त्यामुळे सूडभावना हे कारण सयुक्तिक वाटत नाही. कारण  पूर्वीपासून जरी पाहिले तरी अगदी रामायणात देखील कैकेयीने दशरथावर अधिकार गाजवला इतका की त्या भरात त्याचा मृत्यू घडला तरी तिला दया आली नाही. नंतर सीतेने कांचनमृगाचा हट्ट धरल्यामुळे रामाला तो मान्य करावा लागला व पुढे रामायण घडले. रावणानेसुद्धा  शूर्पणखेच्या म्ह. एका स्त्रीच्याच हट्टासाठी  सीतेला पळवून आणले तरी आपली पत्नी मंदोदरीच्या धाकाने तिच्या अंगाला हात लावला नाही. महाभारतात द्रौपदीचा भरसभेत अपमान झाला तरी पाचही नवऱ्यांवर तिचेच वर्चस्व होते.त्यापूर्वी मत्स्यगंधेने शंतनूकडून भीष्माला राज्यापासून वंचित व्हायला लावले होते.म्हणजे पूर्वीपासून बायकोचे वर्चस्व नवऱ्यावर असलेले दिसते.तीच परंपरा स्त्रिया आताही चालवत आहेत असे का म्हणू नये?मात्र आता कायदेही त्यांच्याच बजूने असल्यामुळे नवऱ्यांचे जीवन असह्य झाले आहे असे बातमीत म्हटले आहे.