दोन भावना आहेत. ज्याला वाटतं आपल्यावर अन्याय झाला तोच बदला घेण्याचा प्रयत्न करतो. ऐतिहासिक उदाहरणं बघण्यापेक्षा स्वत:च्या व्यक्तिगत जीवनात समन्वय साधणं मोलाच आहे कारण तो खरा रोजच्या जगण्याचा प्रश्न आहे. जर घरात आनंदी आणि सृजनात्मक वातावरण हवं असेल तर सर्वांना समान संधी, स्वविकासाचे पर्याय आणि परस्परिक विश्वास हवा.
माझ्या खेळाच्या ग्रुप मधल्या एका चौतीस वर्षाच्या मुलाची आतापर्यंत तीन लग्न झालीयेत! कुटुंब व्यवस्थाच धोक्यात आलीये आणि मला सर्वात मोठा प्रश्न वाटतो तो मुलांच्या संगोपनाचा. पती-पत्नीतला बेबनाव मुलांचं बालपण अस्थिर करतो, त्यांना घराशी कनेक्टिवीटी वाटत नाही मग त्यातून अयोग्य संगत, व्यसनं, धेयहिनता असे अनेकानेक प्रश्न निर्माण होऊन पुढे सामाजिक जीवानात ते अस्वास्थ्य प्रकट होतं.
तुम्ही नीट पाहिलत तर हा प्रश्न सरसकट स्त्रीजात व पुरुषजात यांचाशी संबंधित आहे, स्री-पुरूष सहजीवनाशी संपूर्णपणे निगडीत आहे आणि अत्यंत निकडीनी सोडवावा लागणार आहे. तुम्हाला कल्पना नसेल पण यातूनच पुढे लिव्ह-इन-रिलेशन सारखे बेजवाबदार पर्याय मग हळूहळू अनौरस मुलांचे प्रश्न आणि मग एकीकडे प्रचंड समृद्धी आणि दुसरीकडे पराकोटीचं अस्वास्थ्य असा समाज तयार होतो.
संजय