आपल्या कथा साधारनपणे सत्य घटनांवर आधारित असतात, तशीच ही पण असेल असे समजून मत व्यक्त करतो आहे. कल्पित घटनांना हवे तसे वळण देता येत असल्याने त्यातील पात्रांच्या वागणुकीबद्दल मतप्रदर्शन करणे निरर्थक असते.
विनयच्या स्वाभिमानशून्य वागण्याचे आश्चर्य वाटले. त्याच्या वडिलांचा सल्ला योग्य होता. प्रेमाखातर लग्न करून अमेरिकेत आला हे समजू शकतो. पण दोनेक वर्षे नोकरी मिळत नाही ही कुचंबणा कमी म्हणून की काय सविताही त्याला घालून पाडून बोलते आहे. तरीही हा भारतात आपला व्यवसाय सांभाळण्यासाठी परत यायच्याऐवजी तो मानहानीचे जीवन जगतो आहे हे आश्चर्य आहे.
सवितेचा कॅल्क्युटिव आणि महत्त्वाकांक्षी स्वभाव विचारात घेता पुढे विनयला "लूजर"ठरवून ती त्याला घटस्फोट घेऊन दुसऱ्याशी लग्न करण्याची दाट शक्यता आहे. तसे घडायच्या आधी विनयने आपला निर्णय घ्यावा असे वाटते.
विनायक